Back to Home
आषाढी एकादशी
आषाढी वारी म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा दिव्य सोहळा! शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली 'आषाढी वारी' महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी द...
Event Date
25 Jul, 2026
Event Time
11:00 AM
Location
IDEAL SCHOOL AND LGM JUNIOR COLLEGE
आषाढी वारी म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा दिव्य सोहळा! शेकडो वर्षांची वैभवशाली परंपरा असलेली 'आषाढी वारी' महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी दरवर्षी भक्तिभावात आणि 'ज्ञानबा-तुकाराम' च्या जयघोषात लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला येत असतात. हा केवळ एक प्रवास नसून आत्मशुद्धीचा आणि समर्पणाचा सोहळा आहे.
वारीत सहभागी होऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतात . यावेळी सर्व वारकरी बांधवांचा प्रवास सुखाचा होवो अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी बांधवांशी संवाद साधण्याची अनुभूती मिळते .
भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या पवित्र क्षणांनी मनात एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते .
राम कृष्ण हरी🚩
